Sairat Marathi Movie 2016 A Love Story That Redefined Cinema

Sairat – सैराट  नाव ऐकताच डोळ्या समोर उभा राहतो, तो गाव खेड्याशी जुळलेला अद्वितीय अद्भुत असा नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रित झालेली एक अत्यंत साधी  सरळ मातीशी नाळ जोडणारा चित्रपट. मराठी चित्रपट सिनेमा सृष्टीच्या इतिहासात कोरलेले,  सुवर्ण अक्षरांनी लिहलेले पान ज्याने बॉक्स ऑफिस च्या चौकटी बाहेर जाऊन रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसोबत भारतभरात आणि जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली.  ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्सल भावनेला आणि तिथल्या प्रेमळ नात्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच कामं “Sairat ” या चित्रपटाने केलं.

गोष्ट तशी सर्वच प्रेम युवकांची , पण ती  अर्ची  आणि परश्याच्या प्रेमकथेतून जागासमोर आली. कारण होतं  ते,  जाति व्यवस्था , त्या मागे घडणारा  संघर्ष  , प्रेमासाठी घडून आलेला वा अर्थात परिस्थिती नुसार घडला गेलेला  बंडखोरपणा ,आणि त्यामुळे समोर आलेला नात्यातील कडवटपणा या सगळ्याच गोष्टिनी या चित्रपटाला उचलून धरले . “झिंगाट”च्या तलवार नाचणाऱ्या पायापासून ते शेवटच्या हृदयस्पर्शी दृश्यां पर्यंत, त्या क्षणा पर्यंत , या चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. काही चित्रपट वास्तविक दृष्ट्या आपल्याला जकडून घट्ट धरून ठेवतात . त्यापैकी हा  सिनेमा  ज्याने प्रत्येक प्रेक्षकाला शेवटच्या क्षणापर्यंत सिनेमगृहात सीट ला धरून ठेवले होते.  मराठी सिनेमाच्या बॉक्स ऑफिसच्या मर्यादा मोडणारा आणि प्रादेशिक चित्रपटसृष्टीच्या यादीत स्वतःची ओळख बनवणारा सैराट मराठी चित्रपटाचा नवा चेहरा ठरला.

या आधी मराठीत चित्रपट आले , प्रेमाचा वेगवेगळ्या शैलीत गोष्टी दाखवल्या गेल्या , पण कधीच कोणत्या चित्रपटात म्हणजे ना हिंदी भाषेतील , ना मराठी,  ना इतर भाषेतील चित्रपटात कोणत्याही प्रकारे वास्तविक गोष्टींचा उलगडा करणारा सिनेमा जागासमोर मांडण्यात आला. पण सैराट या चित्रपटाने अर्थात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांची अतिशय उत्कृष्ट storytelling च्या स्वरूपात खूप सहजतेने आणि हुशारीने गोड बोलून कडवट पणा जागासमोर मांडून  चित्रपट सृष्टीत एक नवीन क्रांति घडवून आली .खरतर चित्रपट हा मनोरंजनाचा सर्वात मोठा भाग , चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मनोरंजनातून मांडण दिग्दर्शकसाठी एक मोठी संधी असते आणि याच संधीच सन करणार दिग्दर्शक  ठरले अभिनेते व दिग्दर्शक नागराज मंजुळे .

चित्रपट पाहण्यासाठी  येथे क्लिक  करा – “सैराट २०१६”

Sairat Marathi Movie : A Love Story That Redefined Cinema

“सैराट” हा चित्रपट 2016 रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटचे दिग्दर्शन नागराज पोपटराव मंजुळे यांनी केले आहे. चित्रपटाला रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे , अरबाज शैख, सूरज पवार, संभाजी तांगडे, सुरेश विश्वकरमा, छाया कदम, धनंजय नानावारे, ज्योति सुभाष या सारख्या अष्टपैलू कलाकार मंडळीची साथ लाभली आहे.

“सैराट” सिनेमा एक साध्या प्रेमकथेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नावर समाजात घडणाऱ्या गोष्टिना जगसमोर मांडत , निडर भिडतो , रोखठोक सत्य दाखवत , निशब्द करतो. चितप्तच्या माध्यमातून समाज समोर सत्य मांडण सोप वाटतं असलं तरी तितकं सोप अजिबात नाही आहे. कारण आशे विशाय  जागासमोर अथवा समाज व प्रेक्षकांसमोर मांडण ते त्यांना पटवून देण खूप मोठे आव्हान असते. कारण काही  सत्य समाजाला किती खोलवर टोचतील किंवा प्रेक्षक त्या गोष्टीला मान्य करतील की नाही,  हा मोठा प्रश्न दिग्दर्शक , लेखक आणि चित्रपटाशी जोडलेल्या सर्वच सदस्यासमोर असतो.

या चित्रपटानत  ग्रामीण भागातील वास्तववादी कथा, आंतरजातीय प्रेमाचं उत्कृष्ट कथन खजुप सुंदर पद्धतीने मांडलं  आहे. गोष्टीतले पात्र , त्यांचा भावनिक प्रवास , पहिल्या प्रेमाचा ओलावा , निरागस पणे व्यक्त केला आहे.  प्रेमाचा प्रवास , कॉलेज मधल्या गमंती , लपून घडलेलूया भेटी, मित्रांनी आपल्या साथी घेतलेली मेहनत, त्यांचा पाठिंबा , राग , रुसवा आणि प्रेम सगळ काही अफलातून पद्धतीत साकारल आहे. पण प्रत्येक गोष्टीत एक तरी विरोधी असतोच. तसच या चित्रपटात विरोधकांची बाजू सुसंगत पणे मांडली आहे. विरोधकांची बाजू पाहताना रंग आल्याशिवाय मन शांत होणार नाही.  हीच ति खरी पावती जिथे खलनायकाची भूमिका गोष्टीला अन् त्या चित्रपटावर विश्वास ठेवायला भाग पडते.

Sairat movie poster , 3. Rinku Rajguru and Akash Thosar in Sairat4. Sairat rural Maharashtra backdrop
Sairat movie poster,  Rinku Rajguru and Akash Thosar in Sairat Sairat rural Maharashtra backdrop

सैराट इतका लोकप्रिय का झाला !

“सैराट” प्रचंड लोकप्रिय झाला कारण त्याची कथा, वास्तविकतेशी जुळणारी , प्रत्येक शहरात घडणारी , सामाजिक प्राशन मांडणारी आणि  पारंपरिक सिनेमांच्या चौकटी मोडणारी होती . नागराज मंजुळे यांनी ही कथा इतक्या ताकदीने साकारली की प्रत्येक प्रेक्षकाला ती आपली वाटू लागली. चित्रपटातील अर्ची , परश्या, अरबाज , तानाजी हे आपलेच मित्र अस्लयसारखे भासले.  या कलाकारांचे  साधेपणा आणि त्यांच्या भावना खऱ्या आयुष्याशी जोडणाऱ्या होत्या. शिवाय, जातीव्यवस्थे वरील प्रश्न विचारून समाजाला जागा करणारा आणि आंतरजातीय प्रेम या सामाजिक प्रश्नांवर प्रखर प्रकाश टाकणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला प्रत्यक्षरूपी भिडला.

सैराट या चित्रपटा  मागे काळकरणी घेतलेली मेहनत , त्यांची जिद्द आणि खरेपणा या चित्रपटला अजून उंचीवर न्हेतो . चित्रपटातील अर्ची अर्थात रिंकू राजगुरू , आकाश ठोसर , अरबाज, तानाजी या नाव कलाकारांची या चित्रपटातून नवीन ओळख नागराज मंजुळे यांनी करून दिली . या नव कलाकारांनी प्रत्यक्षात खूप मेहनत घेतली. अभिनय शिकण्यापसून , त्या पत्राला जगून त्या पात्राना न्याय दिल आणि याचे सर्व श्रेय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाते . त्यांची मेहनत , चित्रपटा  मागची गंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही सैराटच्या नावानं चांगभल या सिरीज ला नक्की पाहू शकता.

चित्रपटातील ठिकाण खरीखुरी असल्याने या चित्रपटाला एक वेगळ वळण नक्कीच मिळाले. कारण या आधी आपण एखादा चित्रपट एक स्टूडिओ मध्ये घडटन पहिला असेल. किंवा आर्टिफिश्यल सेट उभे करून चित्रित झालेले पाहिले असतील. पण सैराट या चित्रपटात दाखवलेली ठिकाण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असून या आधी ते चित्रपटपासून वंचितच होते. नागराज मंजुळे यांनी  आधी प्रत्येक स्थळाला वायक्तिक भेट देऊन चित्रपट उभारण्याची संकल्पना डोक्यात उभी केली. त्यांचा दिग्दर्शन दृष्टीने त्यांना योग्य वाटलेली ठिकाण त्यांनी निवडली आणि कधी न पाहलेली सुंदर स्थळ जगा समोर आली.

चित्रपटाची शूटिंग नागराज मंजुळे यांच्या गावी सोलापूर , करमळा येथे करण्यात आला असून चित्रपटातील इतर भाग खेड्या पाड्यात आणि हैदराबाद सारख्या शहरात  चित्रित झाला आहे. लोकेशन शोधण्यात आटपट च्या संपूर्ण टीमने खूप प्रामाणिकपणे मेहनत घेलत्त्या मुळे चित्रपट अजून सुंदर पणे  सजला गेला.  तेत अजून वैशिष्ट्यपूर्ण लक्ष देऊन पहिले तर कळेल की भाषा , संवाद सुददाह त्या मातीतलेले अस्स गावरण असून ती ऐकण्यात आणि अनुभवण्यात एक वेगळीच मज्जा येते.

चित्रपट , वेब सिरीज  आणि सिरियल च्या माहितीसाठी येथे भेट द्या – linkofentertainment

sairat ला उत्कृष्ट बनवणाऱ्या गोष्टी 

sairat ” चित्रपटाला अविस्मरणीय बनवणाऱ्या त्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी काही विशेष गोष्टींनी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य केलं. त्यातली लोकेशन , त्यातली गावरण अस्सल मराठी भाषा, पात्रांची निसगस्ता , प्रेक्षणीय स्थल, चित्रपटाच उत्कृष्ट दिग्दर्शन , छायाचित्रण आणि या संगल्यान एकत्रित बांधून ठेवणारं गायक अजय-अतुल यांचं संगीत. जितकी गोष्ट महत्त्वाची तितकंच संगीतसुद्धा महत्त्वाचा , कारण जर चित्रपटाला आवाजच नसता तर कदाचित चित्रपट इतका जास्त प्रसिद्ध देखील झाला नसता. चित्रपटसोबत बांधून ठेवणार संगीत आणि नव्यानं प्रेमात पडणारी गाणी आपल्याला एक प्रेमळ भेट म्हणून अजय-अतुल यांनी दिली आहे.  सैराट झालं जी  , आताच बया ,याडं लागलं आणि झिंगत यासारखी गाणी मनातल्या भावनांवर राज्य गाजवत प्रेमाची भावना जागी करतात .

गाण्यांमध्ये सर्वाधिक आवडीच आणि लोकांनी उचलून घेतलेलं , लहानग्या पासून वयो वृद्धापर्यंत तालावर ठेका धरायला लावणारं , कोणताही सं असो , कोणताही कार्यक्रम असो , मग तो सार्वजनिक उत्सव असो वा लग्न कार्य असो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सणात , उत्सवात खात्रीशीर एकमेव गाणं म्हणजेच झिंगाट.. कारण झिंगाट या शब्दातच एक वेगळी झिंग आहे, न नाचणार देखील आपोआप ताल धारेल असं वरच्या पट्टीतलं हे गाणं . गाण्याचे शब्द पुरुपणे गावरण, त्यातली गोष्ट सुद्धा गावरणं , त्यातला डान्स बेफाम होऊन जगाला विसरून स्वतःच्या आनंदात हरवून टाकणारा आहे. या गाण्याची प्रसिद्धी महाराष्ट्रा पूर्ती मर्यादित न राहता अक्ख्या जगभरात झिंगला.. अगदी साता  समुद्रा पार जाऊन परदेशातील रहिवाश्यांना ताल धरायला लावला.

Read This हे वाचा – “पुन्हा एकदा साडे माडे ३” 

अजय-अतुल यांनी साकरलेली  हृदयस्पर्शी गाणी अर्थातच  “सैराट झालं जी” आणि “याड लागलं” यांसारखी गाणी प्रेम, दु:ख, आणि उत्साहाची भावनिक भेट  सादर करतात. अजय-अतुल यांच्या संगीताने प्रेक्षकांना चित्रपटाशी भावनिकदृष्ट्या जोडून ठेवलं. पण प्रेमाने भरलेले शब्द , त्याचे स्वर , त्याचे ताल ,त्याचा ठेका, त्यातल्या बसरीचे स्वर , पियानो मधून छेडलेले तुषार सर्व काही मनाला पहिल्या प्रेमाच्या भूमिकेत घेऊन जातात. 

अजय-अतुल यांनी या चित्रपटासाठी विदेशात जाऊन तयार केलेली melody आपल्या स्वतःला विसरायला भाग पडते. live archestra मध्ये तयार झालेल्या त्या अविस्मरणीय धुन , त्यातयले स्वर आपल्या या गाण्या सोबत जिवंत ठेवतात.  चित्रपट पाहताना बॅक ग्राउंड ला वाजणारं हे संगीत आणि ग्रामीण भागातील निसर्ग , ते मोकळं वातावरण , आणि महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती एकत्रितपणे पाहताना आणि ऐकताना जय सुंदर पने बांधला आहे. त्याच सुंदररीत्या आपल्या संगळ्याचं मन जिंकतो.

अजय-अतुल यांचं संगीत , नागराज मंजुळे यांची कथा , लेखन आणि दिग्दर्शन , सुधाकर रेड्डी यांचं छायाचित्रण आणि नाव कलाकारांनी पत्राला दिलेला योग्य अभिनय रूपी न्याय हे एकत्रितपणे प्रेक्षकांसाठी परिपूर्ण मनोरंजनाची मेजवानी आहे.

Sairat Marathi Movie 2016  A Love Story That Redefined Cinema
Sairat movie poster, Rinku Rajguru and Akash Thosar in Sairat, Sairat rural Maharashtra backdrop
Box Office वर धूमधडाका 

“सैराट” हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक नवीन वळण ठरलं , कारण या अधि कोणत्याच मराठी चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला न्हवता. 100 कोटींचा आकडा पार करत विक्रम करणारा पहिला चित्रपट ठरला.  चित्रपटसाठी लोकांची गर्दी, चित्रपटाच वेड, त्यातले फेमस डायलॉग , ताल धरायला लावणारी गाणी, अजय अतुल यांच संगीत या सगळ्यांनी चित्रपटाला मोठं यश दिलं . 

चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली पुरस्कार , राष्ट्रीय पुरस्कार , वेगवेगळ्या स्तरावरून मिळालेली कौतुकाची थाप, फिल्म फेस्टिवल विजेते नामांकन  ते उत्कृष्ट दिग्दर्शक , लेखक, अभिनेता , अभिनेत्री , संगीत यांच्या सांगोपणाने चित्रपटाने सर्वात मोठी ऊंची गाठली .

Read This हे वाचा – “दिल दोस्ती दुनियादारी”

सैराट चित्रपटाला मिळालेली पुरस्कार 

‘सैराट’ ने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडवला. या चित्रपटाने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – 

  • विशेष उल्लेख (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) – रिंकू राजगुरु – 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये.

फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2017

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘सैराट’
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नागराज मंजुळे
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- रिंकू राजगुरु
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- अजय-अतुल
  • सर्वोत्कृष्ट गीतकार- अजय-अतुल – “याड लागलं”
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)- अजय गोगावले – “याड लागलं”
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला)- चिन्मयी – “सैराट झालं जी”
  • सर्वोत्कृष्ट संवाद- नागराज मंजुळे, भारत मंजुळे
  • सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना- अविनाश सोनवणे
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- अजय-अतुल
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष)- आकाश ठोसर
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला)- रिंकू राजगुरु

मिर्ची म्युझिक अवॉर्ड्स मराठी

  • वर्षाचा सर्वोत्तम अल्बम- ‘सैराट’
  • वर्षाचे सर्वोत्तम गाणे- “याड लागलं”
  • वर्षाचा सर्वोत्तम गायक (पुरुष)-अजय गोगावले – “याड लागलं”
  • वर्षाचा सर्वोत्तम संगीतकार- अजय-अतुल – “सैराट झालं जी”

इतक्या मोठ्या प्रमाणात सैराट आणि सर्व टीमने पुरस्कार मिळवली. “सैराट” ची प्रचंड लोकप्रियता आणि जागतिक स्तरावरील कौतुकाची थाप मराठी सिनेमासाठी अभिमानाची गोष्ट ठरली. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन उंची दिली, जी आजही अनेक चित्रपटांसाठी प्रेरणास्थान ठरली . “सैराट” च्या या अपार यशाने मराठी चित्रपटसृष्टीचे भविष्य अधिक उज्ज्वल झाले आहे.

Follow us on – INSTAGRAM 

Sairat’s Legacy 

“सैराट” ने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा भाग सुरू केला. या चित्रपटाच्या प्रचंड यशाने मराठी सिनेमाला राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाने प्रेरित होऊन बॉलिवूडमध्ये “धडक” हा रिमेक तयार करण्यात आला, ज्याने “सैराट”ची कथा हिंदी भाषेतून  प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.  पण या चित्रपटाची  गंमत मराठी भाषेत आहे ति हिंदी भाषेत नाही तेही तितकचं खरं  .

“सैराट” ने नव्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सामाजिक भान असलेल्या आणि वास्तववादी कथा मांडण्यासाठी प्रेरित केलं.  “सैराट”च्या प्रभावाने मराठी सिनेमांनी अधिक धाडसी विषय हाताळायला सुरुवात केली, ज्यामुळे एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली.”सैराट” आजही मराठी सिनेमासाठी प्रेरणास्थान आहे.

“सैराटच्या नावान चांगभलं “! credit –  “आटपट YouTube”

Leave a Comment